महाकुंभात लागलेल्या भीषण आगीत २५ टेंट जळून खाक झाले आहेत. परंतू, जवळपास २०० टेंट आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे सांगितले जात आहे. जेवण बनवत असताना आग लागली आणि आजुबाजुच्या टेंटमधील तीन सिलिंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाने आग विझविली आहे.
अखिल भारतीय धर्म संघ आणि गीता प्रेस यांचे संयुक्त शिबिर होते. पश्चिम सीमेवरील क्षेत्राला परिभ्रमण क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रशासनाने तो परिसर कोणाला दिला आहे हे मला माहित नाही, त्या बाजूने काहीतरी आगीचे लोळ आमच्या बाजूला आले. काहीही शिल्लक राहिले नाही. देवाच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे गीता प्रेस गोरखपूरचे विश्वस्त कृष्ण कुमार खेमका यांनी सांगितले.